महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १८ मे, २०२४

सुसंवाद असणे आवश्यक

या लेखाचे शीर्षक सुसंवाद असणे आवश्यक आहे, तर सुसंवाद गरजेचा का आहे हे या लेखात वर्णन केलेले आहे. तर मित्रानो आपण जीवन जगताना आपल्याला विविध लोकासोबत संपर्क येतो जसे कि, सुरुवात आपल्या कुटुंबापासून, नंतर आपले मित्र, आपण जिथे काम करतो तेथील आपले वेगवेगळे सहकारी, कुठे कुणाच्या वाढदिवसाला, एखाद्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र येतो. तर या ठिकाणी जर आपण कुणाशी बोललो नाही तर किंवा कुणी तरी आपल्याला स्वतः होऊन बोलेन अशी आपण वाट बघत राहिलो तर संवाद किंवा सुसंवाद होणार नाही. तर त्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे आपण स्वतः होऊन नमस्कार घालणे, विचारपूस करणे गरजेचे असते, त्यामुळे तेथे आपली वेगळी ओळख निर्माण होते. लोक आपल्या संवादा वरून आपल्याला ओळखतात आणि त्याचा उपयोग हि आपण जगात असताना समाजात आपल्याला आणि आपल्या वयक्तिक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होत असतो.


     दुसरी आवश्यकता म्हणजे जर आपण संवाद साधला तर सुसंवाद होईल. कारण आपण विद्यार्थी असाल, व्यवसायिक असाल, घरकाम करत असाल, कुठे तरी नोकरी करत असाल तर प्रत्येक क्षेत्रात आपला किंवा प्रत्येक व्यक्तीचा इतरांशी किंवा इतर व्यक्ती शी संपर्क येतो. तर तिथे आपण जर बोलण्यास कमी पडत असेल तर आपण काही प्रश्न स्वताला विचारावेत जसे कि आपण लवकर कुणाशी का संवाद साधत नाही, किंवा आपला सुसंवाद वाढण्यासाठी काय आपण स्वत मध्ये बदल करणे गरजेचे आहे, ते आपण तपासणे गरजेचे आहे.

    सुसंवादाचे बरेचशे उपयोग आहेत, जसे कि कुणी व्यवस्थित रीतीने आपले मुद्दे बोलत असेल, एखादा विषय व्यवस्थित हाताळत असेल तर त्या व्यक्तीची ती एक कला आहे आणि ती कला तो दिवसेंदिवस विकसित करत असतो. या कलेमुळे त्या व्यक्तीची सामाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते. तर सहसा जे मुले तरुण वयात येतात किंवा नुकतीच दहावी बारावी झालेली आहे अशे तरुण सहसा संवाद करण्यास कुठे तरी लाजतात, किंवा त्यांना काय बोलावे हे सुचत नाही किंवा त्यांना त्यांचे लहान पानापासुंचे वातावरण अगदी शांत असते, किंवा त्यांच्या वर आजूबाजूचं वातावरणाचा तसा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे अशी मुले सहसा सुसंवाद करण्यास, त्यांचे प्रश्न व्यक्त करण्यास तेवढे सक्षम नसतात. तर यासाठी अशा मुलांनी सहसा आपल्या शहरात जिथे जिथे साहित्यक कार्यक्रम असतात, किंवा काही खेळाच्या स्पर्धा असो, किंवा वादविवाद स्पर्धा यामध्ये आवर्जून भाग घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्व विकसित करून घ्यावे.

    अजून सांगायचे झाले तर आतापर्यंत आपण आपल्या सभोवतालची काही कारणे पहिलीत, पण ज्यावेळेस आपण मोठे होतो आपले विवाह होतात, किंवा विवाह जमवायला आपण जातो त्यावेळी आपणास सुसंवाद साधता आला पाहिजे. आपले काय म्हणणे ते क्लियर मांडता आले पाहिजे. कारण लग्न जमवणे म्हणजे आपण एका जीवन अवस्थेतून दुसर्या जीवन व्यवस्थेत एक प्रकारे जात असतो तर हा लग्न व्यवहार अत्यंत हुशारीने किंवा अत्यंत तुमचे बुद्धी जाग्यावर ठेऊन करावा लागतो. कारण इथे ज्यांचे विवाह होणार असतात त्यांच्या जीवनाचा प्रश्न असतो. तर योग्य सुसंवाद साधून आपण ते विवाह जमवले किंवा ज्याचा विवाह आहे त्याने त्याचे व्यवस्थित मत मांडले तरच हे साध्य होते अन्याथा तिथे त्यांना त्याची किमत मोजावी लागते.

 
    अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना तुम्ही तुमचे मत परखड पाने मांडले नाही किंवा तुमचा व्यवहारावर तुम्ही ठाम नसाल तर तुम्ही तिथे कुठे तरी शंभर टक्के फसणार किंवा कुणीतरी तुम्हाला जाणीव पूर्वक फसवणार. कारण तुमच्या मतावर तुम्ही ठाम नाही, त्यासाठी रोजच्या जीवनात आपल्याला जे रोज भेटतात त्यांना नमस्कार घालणे, खुश्हाली विचारणे, किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर त्याठिकाणी आपण सतत अपडेट राहायला हवे. अपडेट राहिल्यामुळे आपण एक प्रकारे आपले ज्ञान दिवसेंदिवस वाढवत असतो, ज्ञान वाढले कि आपली कार्यक्षमता हि वाढतेच.

    बर्याचशा ठिकाणी गैरसमजामुळे वाद (भांडण) विकोपाला जाते, त्यासाठी ज्यांची कुणाची भांडण झाली आहे त्यांनी एकत्र बसून नेमके कोणत्या कारणामुळे आपण भांडतोय याची चर्चा करावी त्यात काही गैरसमज असतील, ज्याची त्यांनी समजून घ्यावी, त्या विषयी चर्चा करून शहानिशा करावी किंवा त्यावर काय योग्य उपाय होईल जेणे करून लवकरात लवकर होणार्या वादावर तोडगा मिळेल किंवा काही तरी उपाय होईल. 

    तर मित्रानो सर्व लेखावरून मला एवढेच सांगायचे आहे कि जीवन जगत असताना आपण प्रतेकानी एकमेकांशी सुसंवाद असू द्यावा जेणे करून आपण आपल्या सोबत आपले नातेवाईक आपले जवळचे सर्व एक प्रकारे समाधानी राहतील, आपले जीवन सुलाभतेणे आपण जगू शकतील, सुसंवादाने बर्याचशा समस्या सोडवल्या जातात.

    त्यामुळे आपले सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुसंवाद असणे अत्यंत आवश्यक (गरजेचे) आहे.

लेखक: ज्ञानेश्वर सु. पांचाळ

    

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

माजलगाव धरण

माजलगाव येथील धरण हे सिंदफणा नदीवर बांधले असून, हे धरण बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचन आणि विद्युत निर्मिती होय. हे धरण माजलगाव शहरापासून चार किलोमीटर दूर आहे. आणि अलीकडच्या काळात पिण्यासाठी देखील या धरणाचे पाणी वापरत आहेत.


       माजलगाव येथील धरण बांधकाम करण्याची सुरवात हि 1977 साली झाली होती व साधारण 1986 साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. जवळपास 3840 चौरस किलोमीटर परिसर पाणलोट क्षेत्र या धरणा ने व्यापले आहे. धरणाची एकूण जल संग्रह क्षमता हि 454 दशलक्ष घण मीटर एवढी असून त्या पैकी 312 दसलक्ष घनमीटर उपयुक्त साठा या जलाशयात उपलब्ध आहे.

      या धरणाची उंची नदी पात्रापासून साधारण 31 मीटर उंच असून, लांबी हि 4668 मीटर आहे. सांडव्याची लांबी साधारण 239 मिटर एवढी आहे.

      धरणामध्ये एकूण बुडणरे क्षेत्र हे 7813 हेक्टर एवढे आहे, या धरणा मध्ये जवळपास 20 बुडीत गावे आहेत. या धरणासाठी 5600 tmc मातीकाम झाले असून 116 tmc दगड काम झाले आहे. 


      पैठण च्या नाथ सागरातून उजव्या कालव्याचे पाणी या धरणाला मिळते. एकूण 13 लक्ष हेक्टर लाभक्षेत्र असून, पैकी सव्वा लाख हेक्टर लागवडी साठी लाभ क्षेत्र होय आणि सिंचनासाठी जवळपास 1 लाख हेक्टर उपयुक्त झालेले आहे. त्याच बरोबर विद्युत निर्मिती साठी सुद्धा या धरणाचा वापर होतो. त्यासाठी तीन संच बसवले असून त्यामधून साधारण 2250 किलो वॉट विद्युत निर्मिती होते. 

       तर अशी ही माजलगाव धरणाची एकूण माहिती असून तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या धरणामुळे सुजलाम सुफलाम झालेले आहेत.

जुना मारुती मंदिर माजलगाव

 माजलगाव शहर हे बीड जिल्ह्यातील एक तालुका आहे, माजलगाव दोन भागात विभागले आहे जसे की जुने माजलगाव आणि नवीन माजलगाव. जुना माजलगाव म्हणजे झेंडा चौक परिसर आणि नवीन माजलगाव हे हनुमान चौक पासून केसापुरी कॅम्प पर्यन्त. तर जुना मारुती मंदिर हे देखील जुने आहे म्हणजे खूप वर्षांपूर्वी हे मंदिर बांधण्यात आले आहे. 

           जुना मारुती ला साधारण मी सहावी ला असल्यापासून दर शनिवारी दर्शन करण्यासाठी जात असे कधी सायकलवर कधी पायी. येथे दर्शनाला गेल्यास खूप शांत आणि प्रसन्न वाटते. या मारुती वर माजलगाव वासीयांची खूप श्रद्धा आहे. दर शनिवारी आणि आमावस्या दिवशी लोक आवर्जून वेळात वेळ काढून येथे दर्शनाला जातात. 

         या मारुतीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे जुन्या माजलगाव म्हणजे झेंडा चौकातून सरळ खाली जावे लागते, पुढे सिंदफना नदी पात्रातून रस्ता केलेला आहे तो रस्ता ओलांडून मारुतीला जाता येते, नदीला थोडे पाणी असते परंतु ते पाणी फार खोल नसते अगदी खूप झाले गुडघ्या इतके, हे पाणी सहज ओलांडून आपण जुन्या मारुतीला जाऊ शकतो. दुसरा मार्ग म्हणजे तेलगाव रोड वरील पूल ओलांडून परभणी चौकातून सरळ पाथरी रोड ने जाणे वाटेत एक किलोमीटर च्या जवळपास डाव्या बाजूला दक्षिण मुखी मारुतीला जाण्यासाठी एक कमान लावली असून तेथून देखील आपण या दक्षिणमुखी मारुती चे दर्शन घेण्यासाठी जाऊ शकतो. 

        या मारुतीला हनुमान जयंतीला महाप्रसाद असतो भल्या पहाटे भाविक दर्शनासाठी येतात. मारुतीचे मंदिर खूप सजवले जाते. लायटिंग मंडप, हनुमान चालिसा पठण वगैरे कार्यक्रम इथे होतात. नदीपात्रातील रस्ता साफ करून त्या पूर्ण रस्त्यावर पाणी मारून स्वच्छ रस्ता केला जातो. 

       सध्या या मारुतीच्या मंदिर परिसरात अगोदर च्या तुलनेत खूप बदल झाले आहेत जसे की भव्य सभामंडप मंदिरासमोर बांधला असून दोन्ही मार्गाकडून येणाऱ्या रस्त्यावर कमानी बांधल्या आहेत, मंदिराच्या सभोवताली लोखनडी पाईपचे कुंपण केले आहे, मंदिर परिसरात लहान मुलांसाठी घसरगुंडी करण्यात आली आहे.

       या मंदिर परिसरात एक लिंबाचे झाड आणि एक हपसा आहे त्याचे पाणी हमखास गोड लागते. नदी पात्रातील रस्ता नदीला पूर आल्यावर बुजून जातो म्हणून भाविकांसाठी पर्यायी रस्ता जो कि पाथरी रोड वरून करण्यात आलेला आहे, या मार्गे लोक दर्शनासाठी जाऊ शकतात. तर असे हे माजलगाव चे जुने हनुमान मंदिर आहे, जे कुणी अजूनही गेले नसतील त्यांनी अवश्य या दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घ्यावे.

आपला विश्वासु,

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ,

रा. माजलगाव.

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पांचाळ सोनार समाज

सोनार समाजामध्ये विविध अठरा पोटजाती आहेत त्यापैकी पांचाळ सोनार हि एक पोटजात आहे. पांचाळ सुतार, पांचाळ लोहार हे पांचाळ जातींपैकीच आहेत. तर फार इतिहासात न जाता अलीकडील अनुभवावरून हा लेख लिहीत आहे. 

          पांचाळ सोनार समाजातील प्रमुख पाच आडनावे आहेत जसे की महामुने, धर्माधिकारी, पंडित, दीक्षित आणि वेदपाठक. इतर आडनावे हि टोपण आडनावे समजली जातात, उदा. पोतदार, पांचाळ इत्यादी. संत नरहरी सोनार यांचे आडनाव देखील महामुनी हे होते (संदर्भ क्र. १) पांचाळ सोनारांची गोत्र देखील पाच आहेत. पांचाळ सोनार समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात शहरात आढळते आणि खेडेगावात अगदी दोन ते चार घरे असतात. पांचाळ सोनार समाज हा जास्त प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, बारामती आणि पुणे या शहरात जास्त प्रमाणत आढळून येतो. 

      पांचाळ सोनार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा सोनार कारागीर असून वर्तमाण काळात या समाजातील युवक वेगवेगळा व्यवसाय व नोकरी ला प्राधान्य देत आहेत. पांचाळ सोनार समाजात उच्चशिक्षित युवकांचे प्रमाण हे अल्पशिक्षित युवकांपेक्षा खूप कमी आहे. हा समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. समाजातील पाहुणे एकमेकास भेटल्यास सहज चर्चा होते "या आपले पांचाळ सोनाराचे घर पहायचे म्हटल्यास शंभर कोसावर एक घर" अशी चर्चा निघते. तर सांगायचे कारण म्हणजे त्यामुळे हा समाज म्हणावा तेवढा आधुनिकतेकडे आलेला नाही.

        पांचाळ सोनार समाजात बटूनची मुंज देखील होते म्हणजे जसे की वय वर्ष दहा म्हणजे बालवयात यांची मुंज करतात. मुंज करताना केस कापले जातात, छोटी शेंडी ठेवतात, बालसंस्कार करतात, जानवे परिधान केले जाते इत्यादी. आधुनिकते सोबत हल्ली जानवे वगैरे कुणी वापरत नाहीत परंतु वयस्कर लोक अजूनही जानवे परिधान करतात.

         पांचाळ सोनार समाज हा शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे दैवज्ञ सोनार, दैवज्ञ ब्राह्मण सोनार, वैश्य सोनार हे देखील शाकाहारी आहेत. 

          पांचाळ सोनार आणि दैवज्ञ यांचे बरेचशे विवाह म्हणजे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत. कारण यांनच्या खूप साऱ्या चालीरीती समान आहेत इत्यादी.

        पांचाळ सोनार समाजात समाजातीलच भटजी असतो जो वीवाह, उपनयन संस्कार, पूजा विधी करतात. मृत्यनन्तर दहावा, तेरावा हे सुद्धा हे भटजीच करतात. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या पांचाळ सोनार भटजींवर बंदी आणली होती. अलीकडील काळात हे पांचाळ सोनार भटजींचे प्रमाण कमी झाले आहे. समाज दिवसेनदिवस आधुनिकतेकडे वळत आहे.

          पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाज हा बऱ्यापैकी सधन आणि सुधारलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र सुधारित भाग आहे आणि सुधारित भाग म्हटल्यास सोनारांची दुकाने बऱ्यापैकी चालतात. 


           आधुनिक म्हणजे मागील दहा वर्षांपासून पांचाळ सोनार समाजाचे वधू वर मेळावे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत कारण ती काळाची गरज आहे. समाजातील घरे दूर दुर असतात कोणाचा पत्ता कोणाला नसतो म्हणून ही वधुवर मेळावा च्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि गरज वंतांना आपला जोडीदार मिळतो. त्यापेक्षा पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि विवाह जुळवा जुळवी साठी होत आहे उदा. वॉटसप, ऑनलाईन वधुवर सूची इत्यादी. 

         या समाजातील खूप युवक उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यापारी देखील आहेत परंतु समाजाचा आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पांचाळ सोनार समाज हा "इतर मागास वर्ग" (OBC) प्रवर्गात गणला जातो.

         हि सर्व माहिती समाज अनुभव, चर्चा आणि वाचनातून या लेखात मांडलेली आहे. तरी वाचकांपैकी अधिक माहिती असेल तर लेखाच्या शेवटी दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.

        आधुनिक उच्चशिक्षित युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.


संदर्भ:1) संत नरहरी सोनार



            

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...