मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २० मे, २०२४

उन्हाची तीव्रता वाढत आहे, झाडे लावा झाडे जगवा

या ब्लॉग चे शीर्षक पाहता आपणास ब्लॉग चा विषय समजला असे मी समजतो. तर आपण सर्व वाचक म्हणाल कि हे वाक्य आम्हाला शाळेत शिकवले आहे, आम्हाला माहिती आहे वगैरे वगैरे. मला हा ब्लॉग आता यावेळी का लिहावा वाटला याचे कारण म्हणजे यावर्षी म्हणजे २०२४ च्या उन्हाची तीव्रता पाहता मला असे जाणवले कि झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि त्याला सर्व आपण मनुष्य प्राणी जिम्मेदार आहोत. मनुष्यांनी जागोजागी सिमेंट कोन्क्रीट चे रस्ते वाढवले, पण रस्त्याच्या दुतर्फा झाडे मात्र लावली नाही, काही ठिकाणी झाडे लावली परंतु ती योग्य पधतिने जगवली नाहीत. त्यानंतर सिमेंट कोन्क्रीट च्या इमारती अति मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्यासाठी झाडे तोडण्यात आली. शेती योग्य जमिनी चा वापर शहरीकरण वाढवण्यासाठी अती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि दिवसेंदिवस ती वाढत आहे.


 

     शहरीकरण वाढत आहे परंतु झाडे मात्र कमी होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. तर मित्रहो आपण पर्यावरण आणि पर्यावरणाचा समतोल वाढवण्यासाठी झाडे कशे वाढवता येतील यासाठी खूप सारे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जसे कि आपण शहरातच झाडांची संख्या कशी वाढवू शकतो, जी झाडे लावली आहेत ती कशा पद्धतीने जगवू शकतो. काही वेळेस असे होते कि आपण मोठा गाजावाजा करून झाडे लावतो परंतु ती झाडे परत पंधरा दिवसात कुणी तरी तोडून टाकतात. तर त्यासाठी ती झाडे मोठी होईपर्यंत त्याची योग्य प्रकारे कशी निगा राखता येईल याचे नियोजन प्रथम होणे गरजेचे आहे. 


   झाडे आपण प्रत्येक इमारतीच्या आवारात लाऊ शकतो जसे कि आपल्या घरातील प्रांगणात, रस्त्यांच्या दुतर्फा, शासकीय इमारतीच्या प्रांगणात, मंदिरासमोरील प्रांगणात, शहरात बगीचा असतो तिथे झाडांची संख्या आपण वाढवू शकतो. तसे पहिले तर झाडे लावण्यासाठी जागा असते पण आपण मनुष्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतो. तर झाडे लावणे आणि ती वाढवणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. कारण झाडामुळे प्रत्येक प्राण्यांना प्राणवायू मोफत मिळतो, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांसारखी मदत दुसरे कुणी करू शकत नाही. 

      सध्याचे २०२४ चे उन्हाचे तापमान पाहता आपणास लक्षात येईल कि यावर्षी चे उन्हाचे चटके हे दरवर्षी पेक्षा जास्त प्रमाणात जाणवत आहेत. आपण प्रवासात पाण्याची थंड बाटली विकत घेतली तर तासाभरात त्या पाण्याच्या बाटलीतील पाणी गरम होत आहे, यावरून समजावे कि उन्हाचे प्रमाण किती वाढले आहे.

      तर प्रथ्वीवरील पर्यावरण आबाधित राखण्यासाठी झाडे लावून जगवणे अत्यंत गरजेचे आहे, तर आपण हा ब्लॉग वाचल्यानंतर लवकरात लवकर आपल्याच्याने शक्य असेल जिथे कुठे आपण झाड लाऊन ते वाढवू शकतो तिथे ते झाड लावावे, जेणे करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपली ती एक प्रकारची मदतच होईल. तर आपणास विनंती आहे कि येणाऱ्या पावसाळ्यात आपण एक तरी झाड लावावे आणि तेथेच न थांबता ते झाड वाढेपर्यंत त्याची निगा राखावी.

 आपला विश्वासू लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

शनिवार, १८ मे, २०२४

सुसंवाद असणे आवश्यक

या लेखाचे शीर्षक सुसंवाद असणे आवश्यक आहे, तर सुसंवाद गरजेचा का आहे हे या लेखात वर्णन केलेले आहे. तर मित्रानो आपण जीवन जगताना आपल्याला विविध लोकासोबत संपर्क येतो जसे कि, सुरुवात आपल्या कुटुंबापासून, नंतर आपले मित्र, आपण जिथे काम करतो तेथील आपले वेगवेगळे सहकारी, कुठे कुणाच्या वाढदिवसाला, एखाद्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र येतो. तर या ठिकाणी जर आपण कुणाशी बोललो नाही तर किंवा कुणी तरी आपल्याला स्वतः होऊन बोलेन अशी आपण वाट बघत राहिलो तर संवाद किंवा सुसंवाद होणार नाही. तर त्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे आपण स्वतः होऊन नमस्कार घालणे, विचारपूस करणे गरजेचे असते, त्यामुळे तेथे आपली वेगळी ओळख निर्माण होते. लोक आपल्या संवादा वरून आपल्याला ओळखतात आणि त्याचा उपयोग हि आपण जगात असताना समाजात आपल्याला आणि आपल्या वयक्तिक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होत असतो.


     दुसरी आवश्यकता म्हणजे जर आपण संवाद साधला तर सुसंवाद होईल. कारण आपण विद्यार्थी असाल, व्यवसायिक असाल, घरकाम करत असाल, कुठे तरी नोकरी करत असाल तर प्रत्येक क्षेत्रात आपला किंवा प्रत्येक व्यक्तीचा इतरांशी किंवा इतर व्यक्ती शी संपर्क येतो. तर तिथे आपण जर बोलण्यास कमी पडत असेल तर आपण काही प्रश्न स्वताला विचारावेत जसे कि आपण लवकर कुणाशी का संवाद साधत नाही, किंवा आपला सुसंवाद वाढण्यासाठी काय आपण स्वत मध्ये बदल करणे गरजेचे आहे, ते आपण तपासणे गरजेचे आहे.

    सुसंवादाचे बरेचशे उपयोग आहेत, जसे कि कुणी व्यवस्थित रीतीने आपले मुद्दे बोलत असेल, एखादा विषय व्यवस्थित हाताळत असेल तर त्या व्यक्तीची ती एक कला आहे आणि ती कला तो दिवसेंदिवस विकसित करत असतो. या कलेमुळे त्या व्यक्तीची सामाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते. तर सहसा जे मुले तरुण वयात येतात किंवा नुकतीच दहावी बारावी झालेली आहे अशे तरुण सहसा संवाद करण्यास कुठे तरी लाजतात, किंवा त्यांना काय बोलावे हे सुचत नाही किंवा त्यांना त्यांचे लहान पानापासुंचे वातावरण अगदी शांत असते, किंवा त्यांच्या वर आजूबाजूचं वातावरणाचा तसा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे अशी मुले सहसा सुसंवाद करण्यास, त्यांचे प्रश्न व्यक्त करण्यास तेवढे सक्षम नसतात. तर यासाठी अशा मुलांनी सहसा आपल्या शहरात जिथे जिथे साहित्यक कार्यक्रम असतात, किंवा काही खेळाच्या स्पर्धा असो, किंवा वादविवाद स्पर्धा यामध्ये आवर्जून भाग घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्व विकसित करून घ्यावे.

    अजून सांगायचे झाले तर आतापर्यंत आपण आपल्या सभोवतालची काही कारणे पहिलीत, पण ज्यावेळेस आपण मोठे होतो आपले विवाह होतात, किंवा विवाह जमवायला आपण जातो त्यावेळी आपणास सुसंवाद साधता आला पाहिजे. आपले काय म्हणणे ते क्लियर मांडता आले पाहिजे. कारण लग्न जमवणे म्हणजे आपण एका जीवन अवस्थेतून दुसर्या जीवन व्यवस्थेत एक प्रकारे जात असतो तर हा लग्न व्यवहार अत्यंत हुशारीने किंवा अत्यंत तुमचे बुद्धी जाग्यावर ठेऊन करावा लागतो. कारण इथे ज्यांचे विवाह होणार असतात त्यांच्या जीवनाचा प्रश्न असतो. तर योग्य सुसंवाद साधून आपण ते विवाह जमवले किंवा ज्याचा विवाह आहे त्याने त्याचे व्यवस्थित मत मांडले तरच हे साध्य होते अन्याथा तिथे त्यांना त्याची किमत मोजावी लागते.

 
    अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना तुम्ही तुमचे मत परखड पाने मांडले नाही किंवा तुमचा व्यवहारावर तुम्ही ठाम नसाल तर तुम्ही तिथे कुठे तरी शंभर टक्के फसणार किंवा कुणीतरी तुम्हाला जाणीव पूर्वक फसवणार. कारण तुमच्या मतावर तुम्ही ठाम नाही, त्यासाठी रोजच्या जीवनात आपल्याला जे रोज भेटतात त्यांना नमस्कार घालणे, खुश्हाली विचारणे, किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर त्याठिकाणी आपण सतत अपडेट राहायला हवे. अपडेट राहिल्यामुळे आपण एक प्रकारे आपले ज्ञान दिवसेंदिवस वाढवत असतो, ज्ञान वाढले कि आपली कार्यक्षमता हि वाढतेच.

    बर्याचशा ठिकाणी गैरसमजामुळे वाद (भांडण) विकोपाला जाते, त्यासाठी ज्यांची कुणाची भांडण झाली आहे त्यांनी एकत्र बसून नेमके कोणत्या कारणामुळे आपण भांडतोय याची चर्चा करावी त्यात काही गैरसमज असतील, ज्याची त्यांनी समजून घ्यावी, त्या विषयी चर्चा करून शहानिशा करावी किंवा त्यावर काय योग्य उपाय होईल जेणे करून लवकरात लवकर होणार्या वादावर तोडगा मिळेल किंवा काही तरी उपाय होईल. 

    तर मित्रानो सर्व लेखावरून मला एवढेच सांगायचे आहे कि जीवन जगत असताना आपण प्रतेकानी एकमेकांशी सुसंवाद असू द्यावा जेणे करून आपण आपल्या सोबत आपले नातेवाईक आपले जवळचे सर्व एक प्रकारे समाधानी राहतील, आपले जीवन सुलाभतेणे आपण जगू शकतील, सुसंवादाने बर्याचशा समस्या सोडवल्या जातात.

    त्यामुळे आपले सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुसंवाद असणे अत्यंत आवश्यक (गरजेचे) आहे.

लेखक: ज्ञानेश्वर सु. पांचाळ

    

मंगळवार, ८ डिसेंबर, २०२०

पांचाळ सोनार समाज

सोनार समाजामध्ये विविध अठरा पोटजाती आहेत त्यापैकी पांचाळ सोनार हि एक पोटजात आहे. पांचाळ सुतार, पांचाळ लोहार हे पांचाळ जातींपैकीच आहेत. तर फार इतिहासात न जाता अलीकडील अनुभवावरून हा लेख लिहीत आहे. 

          पांचाळ सोनार समाजातील प्रमुख पाच आडनावे आहेत जसे की महामुने, धर्माधिकारी, पंडित, दीक्षित आणि वेदपाठक. इतर आडनावे हि टोपण आडनावे समजली जातात, उदा. पोतदार, पांचाळ इत्यादी. संत नरहरी सोनार यांचे आडनाव देखील महामुनी हे होते (संदर्भ क्र. १) पांचाळ सोनारांची गोत्र देखील पाच आहेत. पांचाळ सोनार समाजाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात शहरात आढळते आणि खेडेगावात अगदी दोन ते चार घरे असतात. पांचाळ सोनार समाज हा जास्त प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, सातारा, लातूर, बारामती आणि पुणे या शहरात जास्त प्रमाणत आढळून येतो. 

      पांचाळ सोनार समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा सोनार कारागीर असून वर्तमाण काळात या समाजातील युवक वेगवेगळा व्यवसाय व नोकरी ला प्राधान्य देत आहेत. पांचाळ सोनार समाजात उच्चशिक्षित युवकांचे प्रमाण हे अल्पशिक्षित युवकांपेक्षा खूप कमी आहे. हा समाजाची लोकसंख्या खूप कमी आहे. समाजातील पाहुणे एकमेकास भेटल्यास सहज चर्चा होते "या आपले पांचाळ सोनाराचे घर पहायचे म्हटल्यास शंभर कोसावर एक घर" अशी चर्चा निघते. तर सांगायचे कारण म्हणजे त्यामुळे हा समाज म्हणावा तेवढा आधुनिकतेकडे आलेला नाही.

        पांचाळ सोनार समाजात बटूनची मुंज देखील होते म्हणजे जसे की वय वर्ष दहा म्हणजे बालवयात यांची मुंज करतात. मुंज करताना केस कापले जातात, छोटी शेंडी ठेवतात, बालसंस्कार करतात, जानवे परिधान केले जाते इत्यादी. आधुनिकते सोबत हल्ली जानवे वगैरे कुणी वापरत नाहीत परंतु वयस्कर लोक अजूनही जानवे परिधान करतात.

         पांचाळ सोनार समाज हा शाकाहारी आहे. त्याचप्रमाणे दैवज्ञ सोनार, दैवज्ञ ब्राह्मण सोनार, वैश्य सोनार हे देखील शाकाहारी आहेत. 

          पांचाळ सोनार आणि दैवज्ञ यांचे बरेचशे विवाह म्हणजे रोटी बेटी व्यवहार झालेले आहेत. कारण यांनच्या खूप साऱ्या चालीरीती समान आहेत इत्यादी.

        पांचाळ सोनार समाजात समाजातीलच भटजी असतो जो वीवाह, उपनयन संस्कार, पूजा विधी करतात. मृत्यनन्तर दहावा, तेरावा हे सुद्धा हे भटजीच करतात. पेशवाईच्या काळात पेशव्यांनी या पांचाळ सोनार भटजींवर बंदी आणली होती. अलीकडील काळात हे पांचाळ सोनार भटजींचे प्रमाण कमी झाले आहे. समाज दिवसेनदिवस आधुनिकतेकडे वळत आहे.

          पश्चिम महाराष्ट्रातील पांचाळ सोनार समाज हा बऱ्यापैकी सधन आणि सुधारलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्र सुधारित भाग आहे आणि सुधारित भाग म्हटल्यास सोनारांची दुकाने बऱ्यापैकी चालतात. 


           आधुनिक म्हणजे मागील दहा वर्षांपासून पांचाळ सोनार समाजाचे वधू वर मेळावे दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहेत कारण ती काळाची गरज आहे. समाजातील घरे दूर दुर असतात कोणाचा पत्ता कोणाला नसतो म्हणून ही वधुवर मेळावा च्या ठिकाणी सर्व एकत्र येतात आणि गरज वंतांना आपला जोडीदार मिळतो. त्यापेक्षा पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर हि विवाह जुळवा जुळवी साठी होत आहे उदा. वॉटसप, ऑनलाईन वधुवर सूची इत्यादी. 

         या समाजातील खूप युवक उच्च अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर आणि व्यापारी देखील आहेत परंतु समाजाचा आधुनिक काळानुसार शिक्षणाच्या बाबतीत म्हणावा तेवढा विकास झाला नाही. पांचाळ सोनार समाज हा "इतर मागास वर्ग" (OBC) प्रवर्गात गणला जातो.

         हि सर्व माहिती समाज अनुभव, चर्चा आणि वाचनातून या लेखात मांडलेली आहे. तरी वाचकांपैकी अधिक माहिती असेल तर लेखाच्या शेवटी दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करावी.

        आधुनिक उच्चशिक्षित युवकांनी आपल्या समाजातील युवकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाज प्रगतीपथावर कसा जाईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.


संदर्भ:1) संत नरहरी सोनार



            

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

संत नरहरी सोनार

संत नरहरी सोनार हे थोर संत होते त्यांचा जन्म 1313 मधील असून काही संतांच्या सांगण्यानुसार त्यांचा जन्म 1115 शतकातिल आहे. संत नरहरी सोनार यांचा जन्म पंढरपूर येथील असून ते शैव उपासक होते, म्हणजे ते फक्त भगवान शिवाची पूजा अर्चा करत असत इतर कुठल्याही देवाची ते पूजा वगैरे करत नसत. त्यांच्या घरात शैव पूजा कृपेनेच संत नरहरी सोनार यांचा जन्म झाला आणि त्या काळातील थोर संत चांगदेव यांनी त्यांचे नाव नरहरी ठेवले आणि हा भविष्यात थोर व्यक्ती होईल असे भाकीत केले होते. 


        संत नरहरी सोनार पंढरपुरातील प्रसिद्ध कारागीर होते, दूर वरून लोक त्यांची हातचे अलनकार नेण्यासाठी येत. त्याच क्षेत्रातील प्रसिद्ध सावकाराला खूप वर्षांनी मुल झाले आणि नवस म्हणून त्याने विठ्ठल भगवन्ताला चांदीचा करदोरा देण्याचे ठरवले. त्यासाठी ते संत नरहरी सोनार यांच्या घरी आले व नवस म्हणून भगवान विठ्ठलाला चांदीचा करदोरा करण्यासाठी त्यांनी नरहरी सोनार यांस सांगितले. परंतु संत नरहरी सोनारानी मी हे कार्य करू शकत नाही आपण दुसऱ्या सोनाराकडे करा म्हणून सांगितले. 

       त्यावर सावकाराने कारण विचारले त्यावर संत नरहरी म्हणाले की आम्ही शिवा चे उपासक आहोत आणि इतर कुठल्याही देवाचे दर्शन आम्हास जमत नाही म्हणून सांगितले. पण सावकाराने नरहरी सोनाराकडेच विठ्ठलासाठी करदोरा करण्याचा हट्ट केला, नन्तर नरहरी सोनार एका अटीवर राजी झाले, ती अट म्हणजे विठ्ठलाचे करदोऱ्याचे माप आणल्यास करदोरा तयार करून देतो म्हणून.

     त्यांनतर सावकाराने ठरल्या प्रमाणे विठलाच्या कमरेचे माप घेऊन संत नरहरी सोनार याना दिले, त्यांनंतर संत नरहरी सोनारानी आपल्या कुशल कारागिरीने उत्कृष्ट असा करदोरा बनवला आणि सावकाराला दिला. सावकाराने पूजेच्या दिवशी विठ्ठलाला करदोरा बांधत असताना तो चार बोटे कमी पडू लागला, रागाने सावकार असे कसे झाले म्हणून तावातावाने नरहरी सोनाराकडे निघाले परंतु वाटेत थोडे विचार करुण त्यांनी शांततेने परत चार बोटे करदोरा वाढून देण्यास सांगितले, नन्तर परत विठ्ठलाला करदोरा चार बोटे मोठा झाल्याचे जाणवले. परत सावकार संत नरहरी सोनाराकडे गेले आणि त्याना स्वतः माप घेण्यासाठी विनवणी केली, शेवटी संत नरहरी सोनार डोळ्यावर पट्टी बांधून मोजमाप घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात येण्यास राजी झाले.


       मंदिरात जाण्यापूर्वी त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, विठ्ठल मूर्ती जवळ गेले, संत नरहरी सोनार जेव्हा विठलाच्या गळ्याभोवती हात फिरवत होते त्यावेळी त्यांना भगवान शिवाच्या गळ्यातील सापाची अनुभूती झाली, नन्तर विठ्ठलाच्या कमरेचे माप घेताना त्यांना शिवाची अनुभूती झाली, त्यांनतर परत त्यानी मूर्तीला परत चाचपडून पहिले तर डमरू आणि त्रिशूळाची अनुभूती संत नरहरी सोनार याना झाली, त्याक्षणी संत नरहरी सोनारानी डोळ्यावरील पट्टी काढली तर त्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले आणि डोळ्यावर पट्टी लावल्यास शिवाचे दर्शन झाले. त्या दिवशी "संत नरहरी सोनार याना शिव आणि विठ्ठल एकच आहेत" याचा साक्षात्कार झाला आणि हा साक्षात्कार झाल्यापासून  संत नरहरी सोनार विठ्ठलाचे निसिम भक्त जाहले. 

    || देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार ||

    वरील अभंग म्हणत संत नरहरी सोनार विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन होत असत. 

       इ.स. 1285 मध्ये संत नरहरी सोनार विठ्ठल अलनकृत जाहले. संदर्भ क्र.1. 

     या साक्षात्कार झाल्या नन्तर संत नरहरी सोनार प्रसिद्धीस पावले. सोनार समाजातील सर्व समाज संत नरहरी सोनार महाराजांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरी करतात. 

संदर्भ

1) www.myportal.org.in

2) https://bhaktamal.co

💐💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.



         

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...