शनिवार, २५ मे, २०२४

पी.एच.डी ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया

मित्रानो या लेखाचे शीर्षक सांगते कि हा लेख पीएचडी विषयी माहिती सांगणार आहे. हो तर मित्रानो त्यासाठीच या ब्लॉग चे शीर्षक “पी.एच.डी. ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया” असे लिहिले आहे. असो, तर पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी काही अटी शर्ती असतात, जसे प्रत्येक वर्गात प्रवेश घेण्यासाठी असतात त्याचप्रमाणे पीएचडी ला पण प्रवेश घेण्यासाठी काही क्रायटेरिया ठरलेला असतो तो खालील प्रमाणे.

पात्रता: पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी प्रथमताः ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याने अगोदर पद्युत्तर पदवी (Post Graduation Eg. उदा. MA, MSC, MCA, MTECH, ME etc) पास असणे आवश्यक आहे. पीजी (Post Graduation) विषया मध्ये कमीत कमी ५५ टक्के मार्क असणे बंधनकारक असते, इथे काही विद्यापीठामध्ये पीजी टक्केवारी ची अट कमी जास्त असू शकते, परंतु सहसा ५५ टक्के असणे गरजेचे असते. त्यासाठी आपणास संबंधित विद्यापिठाच्या वेबसाईट वर जाऊन त्या वेबसाईट वर पीएचडी विषयी चे माहिती पत्र पूर्ण पणे वाचणे आवश्यक आहे, या माहिती पत्रामध्ये पीएचडी प्रवेशासाठी लागणारी सर्व माहिती व्यवस्थित रित्या दिलेली असते, तर पीएचडी ला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर संबंधित विद्यापीठाच्या वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

      पेट किंवा नेट किंवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक: पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी पीजी पास असलेल्या विद्यार्थ्याला पेट किंवा नेट किंवा सेट परीक्षा पास असणे बंधनकारक आहे. तर ज्या विध्यार्थाना पीएचडी करण्याची इच्छा आहे. त्या विध्यार्थ्यानी वरील पैकी कोणती हि एक परीक्षा पास असणे बंधनकारक आहे. पेट परीक्षेची माहिती आपणास पुढील उताऱ्या मध्ये दिलेली आहे. नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) हि परीक्षा युजीसी तर्फे वर्षातून दोन वेळेस घेतली जाते त्याची जाहिरात डिसेंबर किंवा जून जुलै मध्ये समन्धित news पेपर मध्ये येत असते किंवा आपण ugc.ac.in या वेबसाईट ला भेट देऊन नेट परीक्षे विषय पूर्ण माहिती घेऊ शकता.

      त्याचप्रमाणे सेट परीक्षा देखील राज्यशासनातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेतली जाते. सेट परीक्षेविषयी माहिती घेण्यासाठी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या वेबसाईट ला भेट देऊन सर्व माहिती मिळवू शकता.

      पेट परीक्षा: विद्यापीठाची पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी एक पात्रता परीक्षा असते. तर जे विद्यार्थी पीजी पास आहेत आणि पीएचडी ला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनी पेट /नेट /सेट परीक्षा पास करणे गरजेचे आहे. पेट म्हणजे (पीएचडी प्रवेश पात्रता परीक्षा) i.e. Ph.D. entrance test. पेट परीक्षा हि प्रत्येक विद्यापीठाची सेपरेट परीक्षा असते जी कि प्रत्येक वर्षी विद्यापीठातर्फे राबवली जाते. पेट परीक्षे ची जाहिरात हि प्रत्येक news paper ला येते, जसे कि लोकमत, सकाळ, लोकसत्ता इत्यादी. तर आपण रोजचा मराठी news पेपर नक्की वाचावा ज्यामध्ये विद्यापीठ समन्धित जाहिराती येत असतात. प्रत्येक विद्यापीठाची पेट परीक्षा हि एकाच वेळी प्रसिद्ध होत नाही त्यांच्या वेगवेगळया तारखा किंवा वेगवेळ्या महिन्यात त्या त्या विध्यापिठाची परीक्षा होत असते.

    पेट परीक्षेसाठी online form भरावा लागतो, समन्धित विद्यापीठाच्या जाहिरातीमध्ये त्या पेट परीक्षेची वेबसाईट दिलेली असते. दिलेल्या वेबसाईट ला भेट देऊन आपण तो पेट परीक्षेचा पूर्ण फॉर्म भरणे आवश्यक आहे. जसे कि विद्यार्थ्याचे पूर्ण नाव, कोणत्या विषयामध्ये पीएचडी करायची आहे त्या विषयाचे नाव, वयक्तिक माहिती, पत्ता, फोटो, ओळखपत्र, पीजी परीक्षेचे मार्क्स, online शुल्क  इत्यादी. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर फॉर्म download करावा लागतो. त्यानंतर पेट परीक्षे च्या जाहीर झालेल्या दिनांक च्या साधारणता आठ दिवस अगोदर हॉलटीकेट online समन्धित वेबसाईट वर येते, ते आपणास download करून त्याची प्रिंट घ्यावी लागते. प्रिंट घेतल्यानंतर परीक्षेच्या दिनांकदिवशी हॉल टीकेट सोबत घेऊन आपणास परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेप्रमाणे हजर राहावे लागते. परीक्षा दिल्यानंतर, परीक्षेचा निकाल साधारणतः १ ते २ महिन्यानंतर लागतो. आपला निकाल आपणास online संबंधित विद्यापीठाच्या वेबसाईट वर पाहण्यास मिळतो. त्यांमध्ये दोन ते तीन मेरीट लिस्ट लागतात त्या त्या मेरीट लिस्ट मध्ये आपले नाव आल्यास आपण पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी पात्र होतात.

तर पेट / नेट / सेट या तीन पैकी एक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपले नाव पात्रता यादीत आल्यानंतर आपण समन्धित विद्यापीठात जाऊन पीएचडी विभागात जाऊन प्रवेशासाठी लागणाऱ्या पुढील प्रक्रियेसाठी चौकशी करावी लागते. त्यासाठी आपणास विद्यापीठाच्या वेबसाईट वर पीएचडी च्या गाईड ची यादी दिलेली असते. त्या गाईड च्या यादी मधून आपणास समन्धित आपल्या विषयाच्या गाईड ची भेट घेऊन आपणास पीएचडी करण्याची इच्छा आहे हे त्यांच्याशी चर्चा करावी लागते आणि सोबत पेट परीक्षा पास झालेले मार्क्स मेमो न्यावा लागतो. आपल्या विषयाचा समन्धित गाईड आपणास गाईड करण्यास तयार असेल तर आपण समन्धित विद्यापीठातील पुढील प्रक्रीयासाठी पीएचडी विभागामध्ये चौकशी करू शकता ते आपणास पुढील मार्गदर्शन करतील.

आपणास गाईड मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया म्हणजे विद्यापीठाची संशोधन कमिटी समोर आपल्याला आपण पीएचडी साठी निवडलेल्या संशोधन विषयाचे प्रेझेन्टेशन द्यावे लागते, ज्यामध्ये आपल्या विषयाचे तज्ञ आपणास प्रश्नोत्तर करतात, त्यानंतर आपला पीएचडी संशोधनाचा विषय निश्चित होतो. त्यानंतर आपण पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी निवडले किंवा नाही त्याची फाईनल यादी समन्धित विद्यापीठाच्या वेबसाईट वर जाहीर होते. त्यामध्ये आपण आपले नाव निवडले किंवा नाही हे आपणास समन्धित वेबसाईट ला भेट देऊन खात्री करून घ्यावे लागते. 

    आपले नाव शेवटच्या निवड यादीत आल्यानंतर आपण पीएचडी ला प्रवेश घेऊ शकता. प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रक्रिया म्हणजे विद्यापीठातून प्रवेश फॉर्म घेणे त्यासोबत पीजी पास असलेले मार्कस्मेमो, पेट / नेट / सेट परीक्षा पास झालेले प्रमाणपत्र, प्रवेश शुल्क, जो गाईड निवडला त्या गाईड चे लेटर, ओळख पत्र (आधार कार्ड, pan कार्ड इत्यादी) ची सत्यप्रत जोडावी लागते. शेवटी आपणास हा फॉर्म समन्धित विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयात जमा करावा लागतो, त्यानंतर विद्यापीठ आपणास आपला प्रवेश निश्चित झाला किंवा नाही हे, प्रवेशित यादी मध्ये जाहीर करते, त्यासाठी आपणास विद्यापीठाच्या साम्द्न्धीत वेबसाईट ला भेट देत राहावे लागते. प्रवेश निश्चित यादीत आपले नाव आल्या नंतर आपला पीएचडी साठी प्रवेश झाला आहे हे निश्चित होते. शेवटी आपणास प्रवेश निश्चित झाल्याचे पत्र (लेटर) दिले जाते, ज्यामध्ये आपला प्रवेश क्रमांक, आपला संशोधन विषय व गाईड चे नाव इत्यादीचा उल्लेख असतो. तिथून पुढे आपण आपल्या विषयाचे संशोधनकार्याला सुरुवात करू शकता.

तर आपण पीएचडी ला प्रवेश घेऊ इच्छित असाल तर, आपणास पीएचडी प्रवेश घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

 

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ   





सोमवार, २० मे, २०२४

उन्हाची तीव्रता वाढत आहे, झाडे लावा झाडे जगवा

या ब्लॉग चे शीर्षक पाहता आपणास ब्लॉग चा विषय समजला असे मी समजतो. तर आपण सर्व वाचक म्हणाल कि हे वाक्य आम्हाला शाळेत शिकवले आहे, आम्हाला माहिती आहे वगैरे वगैरे. मला हा ब्लॉग आता यावेळी का लिहावा वाटला याचे कारण म्हणजे यावर्षी म्हणजे २०२४ च्या उन्हाची तीव्रता पाहता मला असे जाणवले कि झाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे आणि त्याला सर्व आपण मनुष्य प्राणी जिम्मेदार आहोत. मनुष्यांनी जागोजागी सिमेंट कोन्क्रीट चे रस्ते वाढवले, पण रस्त्याच्या दुतर्फा झाडे मात्र लावली नाही, काही ठिकाणी झाडे लावली परंतु ती योग्य पधतिने जगवली नाहीत. त्यानंतर सिमेंट कोन्क्रीट च्या इमारती अति मोठ्या प्रमाणात वाढल्या, त्यासाठी झाडे तोडण्यात आली. शेती योग्य जमिनी चा वापर शहरीकरण वाढवण्यासाठी अती मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि दिवसेंदिवस ती वाढत आहे.


 

     शहरीकरण वाढत आहे परंतु झाडे मात्र कमी होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. तर मित्रहो आपण पर्यावरण आणि पर्यावरणाचा समतोल वाढवण्यासाठी झाडे कशे वाढवता येतील यासाठी खूप सारे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जसे कि आपण शहरातच झाडांची संख्या कशी वाढवू शकतो, जी झाडे लावली आहेत ती कशा पद्धतीने जगवू शकतो. काही वेळेस असे होते कि आपण मोठा गाजावाजा करून झाडे लावतो परंतु ती झाडे परत पंधरा दिवसात कुणी तरी तोडून टाकतात. तर त्यासाठी ती झाडे मोठी होईपर्यंत त्याची योग्य प्रकारे कशी निगा राखता येईल याचे नियोजन प्रथम होणे गरजेचे आहे. 


   झाडे आपण प्रत्येक इमारतीच्या आवारात लाऊ शकतो जसे कि आपल्या घरातील प्रांगणात, रस्त्यांच्या दुतर्फा, शासकीय इमारतीच्या प्रांगणात, मंदिरासमोरील प्रांगणात, शहरात बगीचा असतो तिथे झाडांची संख्या आपण वाढवू शकतो. तसे पहिले तर झाडे लावण्यासाठी जागा असते पण आपण मनुष्य लोक त्याकडे दुर्लक्ष करतो. तर झाडे लावणे आणि ती वाढवणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. कारण झाडामुळे प्रत्येक प्राण्यांना प्राणवायू मोफत मिळतो, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांसारखी मदत दुसरे कुणी करू शकत नाही. 

      सध्याचे २०२४ चे उन्हाचे तापमान पाहता आपणास लक्षात येईल कि यावर्षी चे उन्हाचे चटके हे दरवर्षी पेक्षा जास्त प्रमाणात जाणवत आहेत. आपण प्रवासात पाण्याची थंड बाटली विकत घेतली तर तासाभरात त्या पाण्याच्या बाटलीतील पाणी गरम होत आहे, यावरून समजावे कि उन्हाचे प्रमाण किती वाढले आहे.

      तर प्रथ्वीवरील पर्यावरण आबाधित राखण्यासाठी झाडे लावून जगवणे अत्यंत गरजेचे आहे, तर आपण हा ब्लॉग वाचल्यानंतर लवकरात लवकर आपल्याच्याने शक्य असेल जिथे कुठे आपण झाड लाऊन ते वाढवू शकतो तिथे ते झाड लावावे, जेणे करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपली ती एक प्रकारची मदतच होईल. तर आपणास विनंती आहे कि येणाऱ्या पावसाळ्यात आपण एक तरी झाड लावावे आणि तेथेच न थांबता ते झाड वाढेपर्यंत त्याची निगा राखावी.

 आपला विश्वासू लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

शनिवार, १८ मे, २०२४

सुसंवाद असणे आवश्यक

या लेखाचे शीर्षक सुसंवाद असणे आवश्यक आहे, तर सुसंवाद गरजेचा का आहे हे या लेखात वर्णन केलेले आहे. तर मित्रानो आपण जीवन जगताना आपल्याला विविध लोकासोबत संपर्क येतो जसे कि, सुरुवात आपल्या कुटुंबापासून, नंतर आपले मित्र, आपण जिथे काम करतो तेथील आपले वेगवेगळे सहकारी, कुठे कुणाच्या वाढदिवसाला, एखाद्या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र येतो. तर या ठिकाणी जर आपण कुणाशी बोललो नाही तर किंवा कुणी तरी आपल्याला स्वतः होऊन बोलेन अशी आपण वाट बघत राहिलो तर संवाद किंवा सुसंवाद होणार नाही. तर त्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे आपण स्वतः होऊन नमस्कार घालणे, विचारपूस करणे गरजेचे असते, त्यामुळे तेथे आपली वेगळी ओळख निर्माण होते. लोक आपल्या संवादा वरून आपल्याला ओळखतात आणि त्याचा उपयोग हि आपण जगात असताना समाजात आपल्याला आणि आपल्या वयक्तिक विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होत असतो.


     दुसरी आवश्यकता म्हणजे जर आपण संवाद साधला तर सुसंवाद होईल. कारण आपण विद्यार्थी असाल, व्यवसायिक असाल, घरकाम करत असाल, कुठे तरी नोकरी करत असाल तर प्रत्येक क्षेत्रात आपला किंवा प्रत्येक व्यक्तीचा इतरांशी किंवा इतर व्यक्ती शी संपर्क येतो. तर तिथे आपण जर बोलण्यास कमी पडत असेल तर आपण काही प्रश्न स्वताला विचारावेत जसे कि आपण लवकर कुणाशी का संवाद साधत नाही, किंवा आपला सुसंवाद वाढण्यासाठी काय आपण स्वत मध्ये बदल करणे गरजेचे आहे, ते आपण तपासणे गरजेचे आहे.

    सुसंवादाचे बरेचशे उपयोग आहेत, जसे कि कुणी व्यवस्थित रीतीने आपले मुद्दे बोलत असेल, एखादा विषय व्यवस्थित हाताळत असेल तर त्या व्यक्तीची ती एक कला आहे आणि ती कला तो दिवसेंदिवस विकसित करत असतो. या कलेमुळे त्या व्यक्तीची सामाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते. तर सहसा जे मुले तरुण वयात येतात किंवा नुकतीच दहावी बारावी झालेली आहे अशे तरुण सहसा संवाद करण्यास कुठे तरी लाजतात, किंवा त्यांना काय बोलावे हे सुचत नाही किंवा त्यांना त्यांचे लहान पानापासुंचे वातावरण अगदी शांत असते, किंवा त्यांच्या वर आजूबाजूचं वातावरणाचा तसा प्रभाव पडलेला असतो, त्यामुळे अशी मुले सहसा सुसंवाद करण्यास, त्यांचे प्रश्न व्यक्त करण्यास तेवढे सक्षम नसतात. तर यासाठी अशा मुलांनी सहसा आपल्या शहरात जिथे जिथे साहित्यक कार्यक्रम असतात, किंवा काही खेळाच्या स्पर्धा असो, किंवा वादविवाद स्पर्धा यामध्ये आवर्जून भाग घ्यावा आणि आपल्या व्यक्तिमत्व विकसित करून घ्यावे.

    अजून सांगायचे झाले तर आतापर्यंत आपण आपल्या सभोवतालची काही कारणे पहिलीत, पण ज्यावेळेस आपण मोठे होतो आपले विवाह होतात, किंवा विवाह जमवायला आपण जातो त्यावेळी आपणास सुसंवाद साधता आला पाहिजे. आपले काय म्हणणे ते क्लियर मांडता आले पाहिजे. कारण लग्न जमवणे म्हणजे आपण एका जीवन अवस्थेतून दुसर्या जीवन व्यवस्थेत एक प्रकारे जात असतो तर हा लग्न व्यवहार अत्यंत हुशारीने किंवा अत्यंत तुमचे बुद्धी जाग्यावर ठेऊन करावा लागतो. कारण इथे ज्यांचे विवाह होणार असतात त्यांच्या जीवनाचा प्रश्न असतो. तर योग्य सुसंवाद साधून आपण ते विवाह जमवले किंवा ज्याचा विवाह आहे त्याने त्याचे व्यवस्थित मत मांडले तरच हे साध्य होते अन्याथा तिथे त्यांना त्याची किमत मोजावी लागते.

 
    अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावहारिक जीवन जगत असताना तुम्ही तुमचे मत परखड पाने मांडले नाही किंवा तुमचा व्यवहारावर तुम्ही ठाम नसाल तर तुम्ही तिथे कुठे तरी शंभर टक्के फसणार किंवा कुणीतरी तुम्हाला जाणीव पूर्वक फसवणार. कारण तुमच्या मतावर तुम्ही ठाम नाही, त्यासाठी रोजच्या जीवनात आपल्याला जे रोज भेटतात त्यांना नमस्कार घालणे, खुश्हाली विचारणे, किंवा कामाच्या ठिकाणी असेल तर त्याठिकाणी आपण सतत अपडेट राहायला हवे. अपडेट राहिल्यामुळे आपण एक प्रकारे आपले ज्ञान दिवसेंदिवस वाढवत असतो, ज्ञान वाढले कि आपली कार्यक्षमता हि वाढतेच.

    बर्याचशा ठिकाणी गैरसमजामुळे वाद (भांडण) विकोपाला जाते, त्यासाठी ज्यांची कुणाची भांडण झाली आहे त्यांनी एकत्र बसून नेमके कोणत्या कारणामुळे आपण भांडतोय याची चर्चा करावी त्यात काही गैरसमज असतील, ज्याची त्यांनी समजून घ्यावी, त्या विषयी चर्चा करून शहानिशा करावी किंवा त्यावर काय योग्य उपाय होईल जेणे करून लवकरात लवकर होणार्या वादावर तोडगा मिळेल किंवा काही तरी उपाय होईल. 

    तर मित्रानो सर्व लेखावरून मला एवढेच सांगायचे आहे कि जीवन जगत असताना आपण प्रतेकानी एकमेकांशी सुसंवाद असू द्यावा जेणे करून आपण आपल्या सोबत आपले नातेवाईक आपले जवळचे सर्व एक प्रकारे समाधानी राहतील, आपले जीवन सुलाभतेणे आपण जगू शकतील, सुसंवादाने बर्याचशा समस्या सोडवल्या जातात.

    त्यामुळे आपले सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी सुसंवाद असणे अत्यंत आवश्यक (गरजेचे) आहे.

लेखक: ज्ञानेश्वर सु. पांचाळ

    

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...