शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

मी अनुभवलेले कुलगुरू (Dr. B. A. M. U. Aurangabad)

पदवी नंतर पुढील शिक्षणासाठी विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळणे म्हणजे एक प्रकारचे मनाला प्रथम आस्चर्यच वाटले होते. 2006 ला विद्यापीठात प्रथम M.Sc. I.T. ला प्रवेश मिळाला त्यावेळेस खूप अभिमान वाटत असे कि मी औरंगाबाद ला आणि तेही विद्यापीठात शिकत आहे आणि अजूनही वाटतो यामध्ये काही दुमत नाही. त्यावेळी कोतापल्ले सर कुलगुरू होते. पदयुत्तर शिक्षण असलंयामुळे कुलगुरू सोबत कधी सम्पर्क आला नाही किंवा त्यांचे भाषण वगैरे जास्त ऐकण्यात आले नाही. कोतापल्ले सर मराठी विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक होते, त्यांच्याविषयी सतत विद्यापीठात मराठी आणि हुमिनिटीझ विभागाचे विद्यार्थी भेटल्यां नंतर चर्चा ऐकायला मिळायची. कोतापल्ले सरांची शैली, दरारा वगैरे वगैरे. परंतु मी त्यांना संगणक शास्त्र विभागात एकदा आणि विद्यापीठातील एडिटोरियम मध्ये एकदा ऐकले होते, मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व जाणवले. 


       माझी M.Sc. 2008 ला पूर्ण झाली आणि त्यांनतर मी विद्यापीठ सोडले नन्तर एक वर्षांनी पदवी फॉर्म विद्यापीठ परीक्षा विभागात apply केला महिनाभरात डिग्री मिळाली त्यावेळेस डिग्रीच्या पेज ची (size) आकार खूप मोठा होता. त्यांनतर परत मी विद्यापीठात येईल याची मला कल्पना देखील नव्हती, परंतु 2012 ला विद्यापीठाकडे परत आलो नेट सेट आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी या उद्देशाने, त्याच वेळेस M. Phil. Computer Sci. ची cet टेस्ट (entrance) आहे हे कळाले. कळल्या नन्तर थोडा विचार करून चलता चलता टेस्ट देऊ म्हणून परीक्षा दिली. काही दिवसांनी mphil cet चा निकाल लागला, दुसऱ्या यादी मध्ये माजे नाव आले, त्यामध्ये थोडी चूक झाली होती, माज्या नावात प्रिंट मिस्टयेक झाली होती, नन्तर नावासमोरील सीट नंबर वरून खात्री झाली की तो माझाच क्रमांक आहे, नन्तर मी M.Phil. ला प्रवेश घेतला 2012 साली. यावेळी कुलगुरू डॉ. विजय पंढरीपांडे होते, या सरांना मात्र बऱ्याच वेळेस ऐकले त्यांची कार्यशैली पाहण्यात आली. 

       पंढरीपांडे सर science (विज्ञान) शाखेचे आणि त्यातल्या त्यात शास्रज्ञा सोबत काम केलेले ज्ञानी व्यक्ती होते. त्यानच्या काळात खूप शिस्तप्रिय कामे झाली. ऑडिटोरियम मध्ये त्यांना विविध कार्यक्रमानिमित्त ऐकले. CFC सेन्टर त्यांच्या कार्यकाळात झाले, पंढरीपांडे सर सकाळी सकाळी अचानक विद्यापीठातील कोणत्याही एका विभागास भेट देत असत, सर्व कामे वेळेवर पूर्ण करणे हे त्यांची कला होती. त्यांच्या काळात विद्यापीठाला A grade NAAC तर्फे मिळाला. त्यांनतर डॉ. बी.य. चोपडे सर विद्यापीठाला कुलगुरू लाभले, हे सर पण विज्ञान शाखेतून पीएचडी झालेले होते. या सरांच्या काळात म्हणजे 2014 ते 2019 खूप सारी कामे विद्यापीठात झाली आणि याच काळात म्हणजे 2015 ला माझे पीएचडी चे registration झाले व पीएचडी चे संशोधन कार्याला सुरुवात मी केली. 

       चोपडे सरानी विद्यापीठातील जसे अंतर्गत रस्ते, बऱ्याचशा नवीन बिल्डिंग चे बांधकाम झाले जसे की फिजिकल एडुकेशन, व्होकेशनल कोर्सची बिल्डिंग, dna बारकोडिंग, incubation सेंटर, अथेलस्टिकस ग्राउंड, प्रिंटिंग टेक्नॉलॉजि, सायकोलॉजि विभाग इत्यादी. विद्यापीठाचा दर्जा टिकवून ठेवण्यात डॉ. बी. ए. चोपडे सर यशस्वी झाले. चोपडे सरांच्या काळात खूप आंदोलने झाली परंतु शैक्षणिक कामे पण खूप झाली. 

       मी चोपडे सरांना व्यक्तीश: इमेल पाठवून तीन ते चार वेळा विद्यार्त्यांचे विविध अडचणी सरांनि सोडवल्या. चोपडे सर माज्या प्रत्येक इमेल ला reply देत असत. पहिल्या इमेल विद्यापीठातील रस्त्यावरच्या लाईट समनधित होता, त्यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी विद्यापीठातील सर्व light बसवण्यात सांगितले. नन्तर हॉस्टेल number 2 मधील वॉटर कुलर तात्काळ बसवले होते, नन्तर गोल्डन जुब्लि फेलोशिप सदंर्भात तातडीने विद्यार्त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले, हॉस्टेल क्र. २ वरील सोलार दुरुस्ती, स्पीड ब्रेकर संमधीत इत्यादी, असे माझ्या वयक्तिक इमेल ला कुलगुरु चोपडे सर तात्काळ प्रतिसाद देत होते. चोपडे सरानी खूप सारी चांगली कामे विद्यापीठात केली. 

        चोपडे सर यांचा कार्यकाळ संपल्या नंतर 2019 ला नवीन कुलगुरु डॉ. येवले सर नागपुर विभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रुजू झाले. डॉ. येवले सर आल्यापासून विद्यापीठातील ऑनलाईन कार्यप्रणाली बऱ्यापैकी चालू आहे. फाईल ट्रॅकिंग चालु करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण होत आहेत. नन्तर लॉकडाऊन जाहीर झाला आणि नोव्हेंबर 2020 पर्यंत चालूच आहे.

💐💐💐💐

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...