कोरोना हा Viral आजार २०२० साली खूप मोठ्या प्रमाणात वाढला. जगातील प्रत्येक देशात हा Covid 19 पोहोचला. यामुळे सर्व जग ठप्प झाले. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ढासळली. वयस्कर माणसे आणि ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांचे प्राण जास्त प्रमाणात गमावले. २०२० हे वर्ष लोकांच्या वयातून वजा झाले.
या वर्षी सर्व लोक घरी बसून होते कारण हा आजार च खूप भयंकर होता आणि आहे, संपर्कातील एका व्यक्ती कडून दुसर्या व्यक्ती कडे जायला काही वेळ लागत नाही. हातात हात दिल्याने, जवळपास शिंक दिल्याने, खोकल्याने, एक मेकाच्या वस्तू वापरल्याने हा आजार पसरतो. या आजार पसरू नये म्हणून शासनाने संचार बंदी केली दवाखाने आणि अत्यावश्यक सेवा सोडता बाकी सर्व बंद होते, ती संचारबंदी जवळपास २ महिने चालू होती. नंतर हळूहळू जिल्हा अंतर्गत आणि नंतर सर्व सुविधा चालू झाल्या. तरी हि लोकांना मास्क वापरणे, हस्तांदोलन केल्यानंतर, बाहेरील वस्तू हताळल्या नंतर Sanitizer वापरणे, गर्दीत जाने टाळणे इत्याद काळजी घेण्यास सरकारने सतत सूचना TV, आकाशवाणी वरून दिल्या.
लोक खूप जागृत झाले. याचा गैर वापर पन झाला, काही खाजगी दवाखान्या मध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाला, जसे करोना नसताना आहे असे सांगून खोटी Treatment करून पैसा लाटण्यात आला. या सर्व चकरा मध्ये लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक सुविधांचे महत्व पटले माणुसकी कळली. निसर्गातील प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले, पाऊस दर वर्षी पेक्षा खूप जास्त पडला इत्यादी. देशाचे आर्थिक नुकसान झाले परंतु निसर्गातील प्रदूषण कमी झाले आणि तेच सर्वांसाठी अत्यावश्यक आहे.त्यामुळे वर्षातून १ महिना का होईना Lockdown असावे.
क्रमश:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा