विवाह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विवाह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ मार्च, २०२३

पळून जाऊन प्रेमविवाह का करू नये

 या ब्लॉग चे शीर्षक “पळून जाऊन प्रेमविवाह का करू नये” असे दिले कारण हा विषय थोडा गंभीर असल्यामुळे. सध्या चे युग हे तेविसावे शतक आहे बरेच जणांना हे जुनाट विचार सरणी असल्यासारखे वाटेल. जुनी विचार सरणी आणि नवीन विचार सरणी असा विचार न करता, याकडे सकारात्मक दृष्टीने पहिले तर याचे चांगले परिणाम होतील. जे काही आपण आयुष्याचे निर्णय घेतो त्याचे दोन परिणाम होतात चांगले आणि वाईट. तर शीर्षकानुसार पळून जाऊन प्रेमविवाह का करू नये. आपल्या भारतीय समाजा मध्ये प्रेमविवाह करण्यास प्रतेक कुटुंबातील पालक वर्ग विरोध करतात. त्यांचे हे विचार करणे साहजिक आहे, कारण पालक मुलांना जन्म देतात, लहानाचे मोठे करतात, शिक्षण देतात, त्या पाल्याला सर्व सुख मिळावे याचे ते नेहमी प्रयत्न करत असतात, चांगल्या वाईट दिवसांमध्ये ते आपल्या पाल्यांना सांभाळून घेतात इत्यादी.


      भारतीय समाजामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे समाज हा जाती मध्ये विभागलेला आहे. मुंबई पुणे सार्ख्या शहरामध्ये जाती पाती पाहून विवाह करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण इतर लहान शहरामध्ये जाती पाहून विवाह होतात. त्या काळानुसार त्या त्या प्रथा योग्य होत्या परंतु आधुनिक काळानुसार नवीन बदल होत आहेत. मुल मोठी होतात, शिकण्यासाठी बाहेर शहरात जातात, तिथे शिक्षण घेतात, नवीन मित्र मैत्रिणी होतात, काही मित्र मैत्रिणी प्रेमात पडतात, विवाह करण्याचा निर्णय घेतात, नंतर त्यांना पालकांना हे प्रकार सांगावेसे वाटत नाही, कारण पालक परवानगी देणार नाही हे साहजिकच असते. नंतर हे प्रेमी युवक युवती पळून जाऊन विवाह करतात. काही काळानंतर पालकांना आपल्या पाल्यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याचे माहिती होते, आणि आई वडिलांना कुटुंबियांना याचा खूप मोठा धक्का बसतो, त्यातले त्यात पालक जर र्हादय रुग्ण असतील तर त्यांना र्हदय विकार होण्याचे प्रकार होतात. त्यातले त्यात काही पालक आपल्या पाल्या साठी खूप स्वप्न जमवलेली असतात, जसे कि माझा मुलगा किंवा मुलगी शहरात शिकायला गेला आहे, मोठी परीक्षा देऊन मोठा अधिकारी होईल नंतर आयुष्याचे सार्थक होईल वगैरे वगैरे. सर्वच तरूण असे निर्णय घेत नाहीत परंतु काही पाल्याना याची जाणीव नसते किंवा त्याचे परिणाम विषयी त्यांना काही जाणीव होत नाही.

       महत्वाचे म्हणजे तरूण मुले किंवा मुली यांना व्यवहाराची आणि अनुभवाची कमी असते. पळून जाऊन विवाह करण्या अगोदर तो मुलगा किंवा मुलगी पुढील जीवन स्वावलंबी जीवन जगू शकतात का, हा विचार होणे गरजेचे आहे, नंतर खरच कोणत्या हि परिस्थिती मध्ये ते एकमेकांना सांभाळून घेऊ शकतात का, नंतर पळून जाऊन विवाह करणे खरेच गरजेचे आहे का, पळून जाऊन विवाह केल्या नंतर आपल्या आई वडील आणि कुटुंबियांना कोणत्या प्रकारची परेशानी होईल, तर असे विचार होणे गरजेचे आहे. आई वडीलाना एकदा विचारून पाहणे आवश्यक आहे, त्यांना पळून जाऊन विवाह करण्या अगोदर विचारणे हि पाल्यांची जिम्मेदारी आहे परंतु बरेचशे मुल मुली तसे करण्यास घाबरतात.

     हा मुला मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे परंतु पालक हि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. आयुष्याचे त्यातल्या त्यात विवाहाचे निर्णय तरी आई वडिलापासून लपवू नये, त्यांना सोबत घेऊनच करायला हवेत. कारण सध्याचे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, समाज खूप मोठ्या गतीने बदलत आहे. त्यामुळे पाल्यांनी शिक्षण पूर्ण होऊन सक्षम होई पर्यंत तरी पळून जाऊन विवाह करू नये. कारण असे विवाह अगोदर खूप घडलेले आहेत, त्यापैकी बरेच म्हणजे जास्तीत जास्त यशस्वी झालेले नाहीत. पळून जाऊन विवाह करणाऱ्या पाल्या सोबत खूप सार्या दुर्घटना झालेल्या आहेत आणि होतात. आपण सर्व पेपर वाचता, बातम्या ऐकता त्यावर पळून जाऊन प्रेमविवाह करणार्यांचे दुर्घटना खूप सार्या बातम्या वाचयला मिळतात. हा लेख वाचून बरेच जन म्हणतील कि आई वडिलांनी लग्न लाऊन दिलेले तरी कुठे सुखी असतात, त्यांच्यात पण खूप सारे भांडण, फारकत वगैरे वगैरे होत असतात, ते सर्व बरोबर आहे परंतु त्यांच्या चांगल्या वाईट परिस्थिती मध्ये त्यांचे पालक त्यांच्या सोबत असतात.

     त्यामुळे मला तरी वाटते, तरुण तरुणींनी आपले शिक्षण आणि आपले जीवन कसे सक्षम आणि स्थिर होईल जेणे करून आपले कुटुंब हि समाधानी राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पालकांचे हि आपल्या पाल्या विषयी स्वप्न असतात. पालकांना विश्वासात घेऊन, परिस्थितीचे भान ठेऊन विवाह सारखे निर्णय घेणे गरजेचे आहे.

क्रमश:

ब्लॉग लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.  

रविवार, २७ डिसेंबर, २०२०

ऑनलाईन विवाह जुळवताना

 विषयाचे नाव वाचून आपल्या डोळ्यासमोर इंटरनेट चे चित्र समोर दिसते कारण विषयच इंटरनेट शी समनधित आहे. सध्याचे वर्तमान युग हे इलेक्ट्रॉनिक युग म्हणून ओळखले जाते, कारण सध्या सर्वत्र इंटरनेटचा वापर हा इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या सहाय्यानेच होत आहे. उदाहरणार्थ: आपला मोबाईल, संगणक, ऑनलाईन फॉर्म भरणे, ऑनलाईन पैसे पाठवणे इत्यादी. म्हणजे इलेक्ट्रॉनिक शिवाय जगणे अवघड होईल जर काही दिवस हे इंटरनेट बंद झाले तर, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 


      सध्या ऑनलाईन प्रणाली च्या सहाय्या ने विवाह जुळत आहेत जसे की ऑनलाईन विवाह जुळवणी च्या वेबसाईट आहेत ज्यावर इच्छुक वर किंवा वधु नोंदणी करून पसंती चे स्थळ निवडतात, उदा. Www.shadi.com, matchmeker इत्यादी. तसेच सध्या वॉटसप च्या माध्यमातून बायोडाटा येतात त्यावर हि वधु वरांची थोडक्यात माहिती येते, आणि पसंतीचे विवाह जुळतात. 

       ऑनलाईन विवाह जुळवा जुळवी काळाची गरज आहे, कारण प्रत्येकाला वेळ देणे सध्याच्या व्यस्त जीवनात कठीण आहे, त्यातल्या त्यात नाते गोते पाहणे, शिक्षणाची अपेक्षा, नोकरीची जुळवा जुळव, वयाचा, उंचीचा, विचारांचा दिखील विचार केला जातो आणि तो केलाच पाहिजे. कारण पारंपरिक विवाह जुळत होते पण त्यावेळी वॉट्सप, ऑनलाईन विवाह जुळण्याची सुविधा नव्हती त्यामुळे शिक्षण आणि इतर पसंती एवढी कुणी पाहत नव्हते, कारण मुलगा कमावतो एवढे पुरेशे होते आणि मुलीला स्वयंपाक येतो एवढे पुरेशे होते. आता दीवसेंदिवस मुलाच्या आणि मुलीच्या हि अपेक्षा शिक्षणा नुसार आणि नोकरी नुसार वाढल्या आहेत.

     अपेक्षा वाढल्या ठीक आहे ज्याच्या त्याच्या गरजा असतात त्याबद्दल काही दुमत नाही, मूळ विषय म्हणजे ऑनलाईन विवाह जुळवताना प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ऑनलाईन खूप साऱ्या फसवणुकी होत आहेत, जसे चुकीची किंवा फसवी नोंदणी केली जाते, डमी फोटो , शिक्षण टाकून फसवी माहिती देऊन ऑनलाईन विवाह जुळतात आणि विवाह जुळल्या नन्तर , लग्न झाल्यावर डमी उमेदवाराची खरी माहिती मिळते, नन्तर फसवणूक झाल्याची जाणीव होते. त्यांमुळे ऑनलाईन किंवा वॉट्सउप द्वारे विवाह जुळवताना वधु किंवा वर दोन्ही बाजूने योग्य चौकशी करावी, उदा. मुलीचे किंवा मुलाचे शिक्षण, नोकरी किंवा व्यवसाय, घर आहे किंवा नाही, काही आजार आहे किंवा नाही, नाते समंध या सर्व चौकशी होणे अत्यन्त गरजेचे आणि आवश्यक आहे.


    या ब्लॉग लिहिण्याचा उद्देश एवढाच आहे की ऑनलाईन विवाह जुळवताना किंवा वॉट्सप द्वारे मिळालेल्या माहिती ची, म्हणजे उमेदवाराने जी माहिती बायोडाटा वर ऑनलाईन किंवा वॉट्सउप वर दिली आहे ती माहिती खरी आहे का? याची खात्री झाल्याशिवाय विवाह जुळवा जुळवीची घाई करू नये, कारण हा प्रत्येकाच्या म्हणजे ज्यांचे लग्न होणार असते त्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो, मुला मुलींचे आई वडिलांचे स्वप्न असतात आणि खर्च हि खूप सारा होतो म्हणून हे सर्व खात्री लायक पाहणे अत्यन्त आवश्यक आहे.

💐💐💐💐

लेखक,

ज्ञानेश्वर पांचाळ.

Featured post

पार्ट टाईम vs फुलटाईम पीएचडी

  मागील   लेखात आपण पीएचडी ला प् रवेश   कसा करावा याबद्दल माहिती पाहिली . या लेखात आपण पार्ट टाईम किंवा फुलटाईम पीएचडी याबद्दल माहिती घेणार ...